गुरुवार, 21 फ़रवरी 2008

kusalassa Upasampada

kusalassa Upasampada









An Interview of Hotel Owner at Kondiwale

Kondiwale Lene


Bhaje video

Bhaje



Inside the Karle Stupa

karle


बेडसे ये‍थील स्‍तुप व विहाराची चित्रे



बेडसे येथील विहाराचे चित्रीकरण

पाठ

सोडतांना प्राण त्‍यांना मी कुठे बोलावले ?
खातरी झाली न त्‍यांची .. ते घरी डोकावले !

हा कसा झिम्‍मा विजांशी ओठ माझे खेळती
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्‍हावले ?

ऐकली आजन्‍म त्‍यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)

मी न स्‍वप्‍नांचे कधीही मान्‍य केले मागणे
दु:ख माझे एकट्याचे मी कधी लाडावले ?

जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणा-यांचेच डोळे शेवटी पाणावले !


वेचण्‍या जेव्‍हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्‍द सारे धावले !

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले !

- सुरेश भट

भिमराव पांचाळे

नभातले तारे

तु नभातले तारे माळलेस का?... तेव्‍हा
माझियाच स्‍वप्‍नांना जाळलेस का? तेव्‍हा
तु नभातले तारे माळलेस का?....

आज का तुला माझे एवढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का ?....तेव्‍हा।।

हे तुझे मला आता वाचणे सुरु झाले
एक पान ही माझे चाळलेस का ?....तेव्‍हा।।

चुंबिलास तु माझा शब्‍द शब्‍द एकांकी
ओठ नेमके माझे टाळलेस का ?... तेव्‍हा



आयुष्‍य

आयुष्‍य तेच आहे
अन् हाच पेच आहे

बोलु घरी कुणाशी
तेही सुनेच आहे

तू भेटसी नव्‍याने
बाकी जूनेच आहे

केलीस याद तु ही
का हे खरेच आहे



सरकनारे किनारे

मी किनारे सरकतांना पाहिले
मी मला आक्रंदतांना पाहिले

कोणती जादू अशी केलीस तू
मी धुके गंधाळतांना पाहिले
मी किनारे सरकतांना पाहिले

पाकळ्या खंतावूनी जेव्‍हा गळाल्‍या
मी फुलांना झिंगतांना पाहिले
मी किनारे सरकतांना पाहिले

लोक ते मागे फिराया लागले
मी तुला रेंगाळतांना पाहिले
मी किनारे सरकतांना पाहिले


तुझा गोडवा

तुझा तसाच गोडवा असेल ही नसेल ही।
तसा उन्‍हात गारवा असेल ही नसेल ही।।

अजून रोज हिंडते नभात एक पाखरु।
उदास तोच पारवा असेल ही नसेल ही।।
तुझा तसाच गोडवा असेल ही नसेल ही !!

निवांत एकटाच मी निवांत ही तुझी नशा।
तुझ्या स्‍वरात मारवा असेल ही नसेल ही ।।

किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती ।।
हवी तशीच ही हवा असेल ही नसेल ही।।

बेडसे लेणे

लेणं किंवा लेणे हा मराठी शब्‍द 'लावण्‍य' या शब्‍दातून निर्माण झाला असून लावण्‍याचा समानार्थी शब्‍द सौंदर्य असा होतो. लेणं लेवूनच रुपाचे सौंदर्य वाढविल्‍या जाते. सह्याद्रीचे सौंदर्य वाढविण्‍याचेच काम ह्या शिल्‍पकृतींनी केले म्‍हणूनच कि काय मराठी भूमीपूत्रांनी ह्या शिल्‍पकृतींना तसचं साजेसं नांव दिले ते म्‍हणजे लेणी किंवा लेणे. महाराष्‍ट्रभर पसरलेल्‍या विशाल डोंगर माळांवर ह्या लेण्‍या नवश्रृंगार केलेल्‍या लावण्‍यवती नववधू सारख्‍या लाजून लपलेल्या आहेत.

काही लोक यांना गुंफा म्‍हणतात किंवा इंग्रजीमध्‍ये Caves म्‍हणतात. परंतू ते तिककेसे पटत नाही. ह्या लेण्‍यांमध्‍ये आदिमानव राहत नव्‍हता तर मानवाच्‍या आध्‍या‍त्मिक, भौतिक, नैसर्गिक, विकासाचा अत्‍युच्‍च बिंदू दर्शविणा-या ह्या लेण्‍यांना गुंफा किंवा Caves संबोधने कसे योग्‍य ठरेल? या नाजूक कलाकुसरींन काठीण्‍यातून कमनियता, परिश्रमातून परमता, भंगतेतून चिरंतनता, चिरंतेतून चैतन्‍यता दाखवून दगडात जीव ओतण्‍याचे काम केले आहे. हे खरेच डोंगरांनी ल्‍यालेलं अद्वितिय लेणंच आहे म्‍हणून भूमीपूत्रांनी केलेलं यांचं नामकरण 'लेणं' हे अगदी सार्थक असेच वाटते.


बेडसे लेणे 'बेडसा' या नावाने सुद्धा ओळखल्‍या जातात. महाराष्‍ट्र पूणे जिल्‍हातील मावळ तालुक्‍यात बेडसे लेणे आहेत. लोणावळा पुणे राष्ट्रिय महामार्गा क्रमांक 4 वर; लोणावळ्यापासून सोमटने फाट्यापर्यंत या व तेथून बेडसे गांवाकडे जाणा-या मार्गाने पुढे गेल्‍यास; जवळच सह्याद्रीच्‍या रांगांमध्‍ये ह्या लेण्‍या आहेत.

ह्या लेण्‍यांचा काळ इसवी सनापूर्वी पहिल्‍या शतकातील सांगीतला जातो. बेडसे येथे दोन प्रमुख्‍य लेण्‍या आहेत ज्‍यामध्‍ये एक चैत्‍यगृह असनू त्‍यामध्‍ये भव्‍य स्‍तुप आहे तर दूसरी लेणी विहार आहे. बेडसेच्‍या लेण्‍या सूर्यमुखी असून पहाटेचे कोवळ्या उन्‍हाची प्रथम किरण ही ह्या सुंदर स्‍तुपावर पडते. प्रभातीच्‍या कोवळ्या उन्‍हात ह्या लेण्‍या बघण्‍यात एक वेगळाच आनंद मिळतो. कार्ले व भाजे या दोन ठिकाणच्‍या लेण्‍यांपेक्षा बेडसेची प्रसिद्धी कमी आहे त्‍यामुळे इथे गर्दी अजिबात नसते. कधी तरी एखाद दूसरी ट्रिप सोडली तर इथे कुणी सहसा जात नाही. पण जर कार्ले भाजेला जात असाल तर नक्‍कीच बेडसेला भेट द्या. एक अपूर्व अशी 2100 वर्षापूर्वीची कोरीव लेणी पाहण्‍याचा आनंद ही अपूर्वच असतो.

कार्ले व भाजे ह्या लेण्‍या ब-याच प्र‍चलित आहेत; त्‍यामुळे त्‍यांची माहिती येथे देणे उचित होणार नाही. जिज्ञासूंनां ही माहिती विकीपेडिया किंवा इतर वेब साईटवर सुद्धा मिळू शकेल. बेडसे एक प्राचिन सुंदर परंतू तरी दूर्लक्षित लेणे आहे म्‍हणून त्‍याचा उल्‍लेख करणे महत्‍वाचे आहे.

शेतक-याचे मनोगत

काऊन गा शामराव खाटीवर झोपला
काय सांगू राजा निसर्गच कोपला
मागच्‍या वर्षी कापसाची गंजी ठेवली भरुन
भाव नोता कापसाले जागीच गेली इरुन
मग या वषी सोयाबीन पेरंल...
अन.. पाणी नाई म्‍हणून जागच्‍या जागी इरलं
लहान पोरगा राजा तापान झोपला
अन काय सांगू राजा निसर्गच कोपला
जहर घ्‍यावं की फासी सूचत नाई मले
अन सारचं कसं इचकुन गेलं काय सांगु तुले
मदत नाई पाणी नाई कस माये होईल
शासनाच अनुदान तेरवीच्‍या कामी येईल
देवई मायासाठी गोळ्या घेवून झोपला
अन काय सांगू राजा निसर्गच कोपला

- प्रा. देशमुख, चंद्रपुर

किसान

जब किसानों की देखी भलाई
हमने खुशियॉं मनाई
हमने खुशियॉं मनाई

उसकी राजी से दुनिया खिलेगी
तभी नस नस में दौलत फुलेगी
उसका चुके कभी ना निशाना
वो पकाये जो मिट्टी में दाना
उसने सीखा ना करना बहाना
सारी दुनिया को कहता वो भाई
हमने खुशियॉं मनाई
हमने खुशियॉं मनाई
जब किसानों की देखी भलाई
हमने खुशियॉं मनाई
हमने खुशियॉं मनाई

- राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज

गालि‍ब

रोक लो गर गलत चले कोई
बक्‍श दो गर खता करें कोई


बक रहा हूँ जूनुन में क्‍या क्‍या कुछ
कुछ ना समझे खुदा करें कोई


जब तव्‍वकु ही उठ गयी गालि‍ब
कौन कि‍सी का गीला करें कोई

- गालि‍ब

संघं शरणं गच्‍छामी

जब दुनि‍या से प्‍यार उठे
नफरत की दिवार उठे
धरती की काया कापे
अंबर डगमग उठे डोल
तब मानव तू मुख से बोल
बुद्धं शरणं गच्‍छामी
धम्‍मं शरणं गच्‍छामी
संघं शरणं गच्‍छामी

घबराये जब मन अनमोल
और हृदय हो डावाडोला
तब मानव तू मुख से बोल
बुद्धं शरणं गच्‍छामी
धम्‍मं शरणं गच्‍छामी
संघं शरणं गच्‍छामी

लाल लहू का काल उठे
हिंसा की कोई आग उठे
मानव में पशु जाग उठे
उपर से मुसकाते
भीतर सहज से तु बोल
तब मानव तू मुख से बोल
बुद्धं शरणं गच्‍छामी
धम्‍मं शरणं गच्‍छामी
संघं शरणं गच्‍छामी

- गायक : मन्‍नाडे
- चित्रपट: अंगुलीमाल

आंबडकरी अंगाई

बाळा थांब रे जोजविते
तुला उचलुन कडेवर घेते ।।धृ।।
तो पहा दिवस वर किती आला
आज माझ्या धंद्याला उशिर झाला
येता जाता तुला हलविते
तुला उचलुन कडेवर घेते.....।।1।।

तो पहा पुढा-यांनी दिंडोरा दिला
सर्व जगात हा आवाज झाला
जिकडे तिकडे जयभिम गर्जते
तुला उचलुन कडेवर घेते।।2।।

ते पहा समता सैनिक आले मैदानी
हाती निळा झेंडा तो फडके गगणी
डोंगर माथ्‍याऊन उंच दिसते..
तुला उचलुन कडेवर घेते।।3।।

तो पहा भगवान बुद्ध आपल्‍या घरी
बाबा भिम बैसले त्‍यांच्‍या शेजारी
तुला मला सर्वांना पाहते
तुला उचलुन कडेवर घेते....।।4।।

- वामन कर्डक

उत्‍सव

भारत हा उत्‍सव प्रिय देश आहे असे म्‍हणतात. हे उत्‍सवीपण आता एवढे आततायी आणि उतावळे झाले आहे की बहुतेकांना बरेदा नकोशे झालेले आहे. तरीही हा उत्‍सवांच्‍या नावाखाली हौदोस चालुच आहे. आमच्‍या उत्‍सवाच्‍या कल्‍पना व संकल्‍पना एवढ्या बदललेल्‍या आहेत की त्‍याला उत्‍सव म्‍हणयचा का हा प्रश्‍न पडतो. आमची परंपरा दिव्‍यांची आरास लावून दिवाळी मानायची, शेतात राबणा-या बैलाचे ऋण फेडायचे म्‍हणून पोळा साजरी करण्‍याची असतांना आता मात्र साजरा होणारा प्रत्‍येक दिवस, सण मग दिवाळी असो कि रोझ डे किंवा व्‍हैलेंटाईन असो की होळी, सेलिब्रेट करण्‍याची त-हा ही हौदोसी उत्‍सवांच्‍या व्‍याखेतच मोडत असते. असे उत्‍सव सेलिब्रेट करतांना आम्‍ही नेमके काय करतो ते सुद्धा पाहणे अगत्‍याचे ठरते. उत्‍सव म्‍हटला की अंधारी आणणारी आतषिबाजी किंवा कानाचे पडदे फाडणा-या फटाकांच्‍या स्‍फोट, त्‍यात कानठळ्या बसविणारे अश्‍लील संगीत, भडक रंगांत भपकेदार श्रीमंती दाखविणा-या कापडातील तर्राट झालेली स्‍त्री-पुरुष, अश्‍लील गाण्‍यांच्‍या रिमिक्‍स ठेक्‍यांवर स्‍वतःला सांभाळत परदेशी शिष्‍टाचार पाळत असतात. अशा ह्या उत्‍सवात सहभागी होणा-या प्रत्‍येकाच्‍या मनात रेंगाळणारे विचार ही मात्र किळ्यासांरखेच असतात. आणि शेवटी चमचमीत खाण्‍याने ह्या उत्‍सवांची सांगता ही होते. हे सर्व सांगण्‍याचे कारण म्‍हणजे दरवर्षी येणारा आणि तेवढ्याच जल्‍लोषात साजरा होणार नववर्षाचा दिवस.

ह्या वर्षी नववर्ष साजरे करण्‍यासाठी तरुण 20 ते 25 हजार रुपये तर चाळीशीतील व्‍यक्ति 10 ते 15 हजार रुपये उधळणार, असे सर्वेक्षण करुन काही वर्तमान पत्रांनी बातमी छापली आहे. जर हे सर्वेक्षण खरे असेल आणि खरेच जर सामान्‍यांकडे एवढे रुपये उधळण्‍यासाठी आले असतील तर आमच्‍या सारख्‍यांची हीच चिंता आहे की ह्या उत्‍सवांचा रंग कसा असेल. का केवळ इतरांनी ही बातमी वाचून आपल्‍या खिशातील महिण्‍यासाठी उरलेले 2 ते 3 हजार रुपये ही खर्च करावे हा उद्देश आहे, हे सांगणे कठीण आहे. नववर्षाच्‍या रात्री एका पंचतारांकीत हॉटेलच्‍या बाहेर एका पुरुषांच्‍या गटाने दोन महिलांचा विनयभंग केला. या बाबत कोणतीही तक्रार पोलिस ठाण्‍यात करण्‍यात आली नाही अशी बातमी लोकमत ने सुद्धा प्रकाशित केली आहे. एका इंग्रजी दैनिकाने या घटनेची छायाचित्रे प्रसिद्ध केल्‍यामुळे ही खळबळ उडाली आहे. 70 ते 80 जणांच्‍या गटांने या महिलांचे कपडे फाडून त्‍यांच्‍याशी गैरवर्तन केले आहे, ह्या महिला आपल्‍या मित्रांबरोबर हॉटेल मधून बाहेर पडून जुहू बीचकडे जात होत्‍या. अशीच एक दूसरी बातमी कानपूर शहरातील आहे कि थर्टिफस्‍ट साजरा करीत असतांना मद्यधुंद अवस्‍थेत गोंधळ घालणा-या सुमारे 300 तरुणांना वनवर्षाच्‍या पहिल्‍या पहाटे पोलीस कोठडीची हवा खावी लागली. आणखीही एक बातमी आहे...अहो किती बातम्‍या अशा सांगाव्‍यात. आपण सुद्धा वाचत असताच ना... माझ्यापेक्षा आपल्‍याकडेच अशा बातम्‍यांचे संदर्भ जास्‍त असतील.
एकी कडे नववर्षाचे रंगीबेरंगी फुगे फुटपाथवर विकुन आपली सांज भागविणारे झोपडपट्टीतील मुले, सिग्‍नलवर थांबलेल्‍या गाड्याच्‍या खिडकीजवळ कॅलेंडर विकणा-या बायका, केवळ टिवी समोर रात्री बारा वाजेपर्यंत बसुन न्‍युइअर साजरे करणारे पांढरपेशे मध्‍यम वर्गीय यांना तर उत्‍सव किंवा सण म्‍हणजे काय हेच सांगायची वेळ आली आहे.

इतरांनी त्‍यांचे पैसे कसे खर्च करावे हा जरी ज्‍याचा त्‍याचा प्रश्‍न असला तरी तो जर अशा उत्‍सवी रितीने उधळल्‍या जात असेल तर ते समाज विघातकच आहे, हे वेगळे सांगायची गरज पडू नये. वाईट चाली रितींना कधी तरी कुणी तरी आळा घालने आवश्‍यक असतेच. याचा अर्थ उत्‍सव करु नये असा नव्‍हे, तर उत्‍सवांचे स्‍वरुप बदलण्‍याची ही खरी वेळ आहे. कुठलाही उत्‍सव, सोहळा वाटावा, मनाला चिंतनशिल बनविणारा, भविष्‍याचा वेध घेणारा असावा हे वाटणे सहाजिक आहे. आम्‍ही आमच्‍या पासून, आमच्‍या घरातून जो पर्यंत ख-या उत्‍सवाचा आरंभ करीत नाही तो पर्यंत हा हौदोस चालुच राहणार आहे. आणि येणारी पिढी ही अशीच बेवडी, चमचमित खाण्‍यासाठी पिणारी, व्‍यभिचारी, स्‍वतःपुरतीच संकुचित झालेली असेल हे सांगायला कुण्‍या भटाची गरज नाही.

हरेक आवाज आज अर्ध्‍यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाट तारा
उजेड येई दिव्‍या दिव्‍यातूनी बाटलेला

असे असले तरीही, हे वर्ष, हौदोसी उत्‍सवांना अंकुश बसविणारे, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद खरे ठरविणारे, सामाजाभिमुख विकासाचे व प्रगतिचे जावो हिच सदिच्‍छा.

उजेड

हरेक आवाज आज अर्ध्‍यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाटतारा
उजेड येई दिव्‍या दिव्‍यातून बाटलेला

-सुरेश भट

घर

जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते मज साधे घर नसतांना, त्‍यांचे तर इमले होत फक्‍त खोट्यालाच झाला त्रास माझा अन जगाने टाळला सहवास माझा... - श्री. वा.न. सरदेसाई

वि‍द्या आणि‍ शि‍क्षण

विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्‍त गेले वित्‍ताविना शुद्र खचले एवढे अनर्थएका अविद्येने केले... आयुष्‍यभर स्‍वतःला विद्यार्थी म्‍हणवून घेणारे आणि शेवटपर्यंत केवळ पुस्‍तकांच्‍याच सानिध्‍यात राहणारे डॉ.आंबेडकर शिक्षणाची महती विशद करतांना म्‍हणतात ......‘’शिक्षण हे वाघि‍णीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्‍याशिवाय राहत नाही’’ आमच्‍या आदर्शांची महावचने नाही म्‍हटले तरी काही अंशी आम्‍ही पाळलीत... आम्‍ही शिकलो... मोठे झालो... मोठ् मोठ्या पगाराच्‍या नोक-या करीत आहोत.. राहणीमान बदललेय... सुटाबुटात राहू लागलोय... शहरात राहू लागलोय.... फुलेंच्‍या महावचनाचा विचार करता एका अविद्येने काय करु शकते ते लक्षात येते पण फुलेंच्‍या महावचनाचा क्रम जरा उलटाकरुन बघूया म्‍हणजे .. . अविद्येचे अनर्थ टाळण्‍यासाठी आम्‍ही विद्या आत्‍मसात केलीआणि आमच्‍याकडेवित्‍त आले.. म्‍हणजेच चांगल्‍या पगाराच्‍या नोक-या मिळविल्‍यात..थोडीशी का होईना गती आली ... मती किती आली हा प्रश्‍न वादाचा आहे... म्‍हणजे ती आली की नाही हेही गंभीरतेने विचार करुनच ठरवावे लागेल.... दूसरे महत्‍वाचे महावचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे... ते म्‍हणजे शिक्षण हे वाघि णीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्‍या शिवाय राहत नाही..... हजारोंनी शिक्षण घेतले लाखों घेत आहेत मग एवढे सगळे वाघि णीचे दूध पि णारे गुरगुरत का नाही. अहो गुरगुरणे सोडाच साधे खकारण्‍याचा आवाज सुद्धा काढत नाहीत... अपवाद सोडले तर सगळेच कसे मेल्‍या सारखी वाटतात. मला नेहमीच हे कोड सुटलेले नाहीए. एक तर ही वचने खोटी असावीत किंवा आम्‍ही घेतलेले शिक्षण हे शिक्षण तरी नसावे किंवा माणसे खोटी असावीत ह्या तीन पर्याया पैकी नक्‍कीच एक खरा असावा असे वाटते... कोणता ?

नि‍र्धार

पि‍पल्‍स सोशल इन्‍स्‍टि‍ट्यूट, या सामाजि‍क संस्‍थेद्वारे प्रकाशि‍त होणा-या 'पि‍पल्‍स एडवाईसर' या बहुभाषि‍क नि‍यतकालीकाच्‍या ऑक्‍टो-डि‍सेंबर 2007 च्‍या नि‍र्धार दि‍न वि‍शेषांकासाठी लि‍हीलेली गझल 'नि‍र्धार' खाली देत आहोत।


'नि‍र्धार'
धार नि‍र्धाराची प्रबल होत आहे।
लढा नि‍र्धाराचा सफल होत आहे।।द्यृ।।

जून्‍या परंपरांचे पेव जेथे जेथे।
फुलें वि‍चारांची तू पेरताच तेथे।
चि‍रा (चि‍रा) बुरुजांचा नि‍खळतोच आहे।।1।।

चालती नि‍श्‍चयाने पाऊले वज्रांची।
हा पंथ संघर्षाचा ही वाट नि‍तीची।।
गर्ज घोष नारा सबल होत आहे।।2।।

तीच ठेचते पेटून खला खलाही।
अखंड नि‍र्धाराची अटूट श्रृंखला ही।।
एकेक ठि‍णगी मशाल होत आहे।।3।।

मनू रोधाचा हतबल होत आहे।
तो पहा शेवटी बदल होत आहे।।
धार नि‍र्धाराची प्रबल होत आहे।।।
लढा नि‍र्धाराचा सफल होत आहे।।4।।

पाणी

वैशाखी दुपार. उन मी म्‍हणत होते. पाण्‍यातल्‍या लहरीसारख्‍या उन्‍हाच्‍या तारा नजरेसमोर नाचत होत्‍या. उजाडल्‍या पासून शेताता कामावर आलेल्‍यांनी परतीची वाट धरली होती. उन्‍हाळ्याच्‍या दि‍वसांत एक पारगीच काम असतं. भल्‍या पहाटे शेतातल्‍या कामांना सुरवात होते अन् दि‍वस माथ्‍यावर येईस्‍तोवर काम आटोपलं जाते. पायाखाली सावल्‍या आल्‍या की बैलगाडी - नांगरा सोबत थकलेले, घामेजलेले, काळवट चेहरे गांवच्‍या दि‍शेने नि‍घालेले दि‍सतात. डोक्‍यावर इंधनाचे भारे अन् तुटलेल्‍या चपलां घासत मळकट हि‍रवी-लाल लूगडी परतीच्‍या वाटेवर दि‍सतात. लुगड्यांवर ढि‍गळ असावं तसा कडेवर लहानगा चि‍टकून असतो. डोक्‍यावर पाण्‍याचं रि‍कामं झालेलं भांड अन् न्‍याहरीच्‍या फडक्‍यात खुरपी गुंडाळून गुडघ्‍यापर्यंत खोचून घेतलेले परकर ही त्‍यांच्‍या मागे पुढे धावत असतांत. भर दुपारचं उन त्‍यात त्‍याच्‍या बसणा-या झावा जि‍वाची लाही-लाही करुन सोडतात. उन्‍हाळ्यात मळ्यातल्‍या वि‍हीरींचे पाणी ही खोल गेलेलं असतं. अर्ध्‍या-अर्ध्‍या घंट्याने पाण्‍याचे उपसे काढावे लागतात तेव्‍हा कुठे दि‍ड दोन गुंठे ओलीत होते. आताच उपसा काढून दुस-या उपस्‍याची वाट पाहत मी वि‍हीरीच्‍या जवळ झाडाखाली अंग टाकलं होतं. उन्‍हाच्‍या झावा केळीच्‍या पट्ट्यातून आल्‍या की गारवा घेवून येतं. हौदातलं नि‍तळ पाणी अजून झि‍रपत होतं. झ-यासारखं ते अजून ही दांडातून वाहत होतं. आमची हाळी कुत्री पि‍साटल्‍या सारखी उन्‍हातून आली अन् फस्कन हौदात जावून बसली. नि‍तळ पाण्‍यात तीचं बसनं माझ्या मनाला चावलं. आता गुळणा करायचा झाला तर ह्याच पाण्‍याचा करायचा का? मी तीच्याकडे दगड फेकला तशी ती किंचाळत केळीच्‍या पट्ट्यात शि‍रली अन् चि‍खलात पाय पसरुन जि‍भे सोबत सारं शरीर हलवत बसली. गावच्‍या वाटेवर परतीची एक दोन पावले सोडली तर जंगलात चि‍ट पाखरु नसतं. रात्रीच्‍या रातकि‍ड्यांनी दि‍वसा सूर लावलेला असतो. आमचा मळा गावापासून बराच लांब आहे. उन्‍हाळ्याच्‍या दि‍वसात तहान भागवायचं तस हे एकच ठि‍काण. एकदा का मळा सोडला तर गावापर्यंत पाणी कुठे मि‍ळायचं नाही. बांधावरच्‍या कडूनिंबाच्‍या सावलीत धापा टाकत येवून दोघ्‍या जणी थांबल्‍या. त्‍यांनी डोक्‍यावरचे इंधनाचे भारे खाली फेकून पदराने तोंडावरचा घाम पुसला. त्‍यातली एक माझ्याकडे येत म्‍हणाली, 'पाणी न्‍हाईकाय रे भाउ, जरा मशीन चालू करणं बापा, लय तहान लागली आमाले'. मी काही बोलणार एवढ्यात तीच परत म्‍हणाली, त्‍या मास्‍तरबोवाचा मया हाय ना हा? मी फक्‍त 'हो' म्‍हणालो. लाईट नाईकाय आता? मशीन चालू करणं..' तहान अन् ती शमवि‍ण्‍याची ओढ तीच्‍या चेह-यावर भि‍जत होती.
'येवं शांते..' तीने दुसरीला आवाज दि‍ला. आतापर्यंत कडूनिंबाच्‍या सावलीत घाम पुसत बसलेली शांती 'हाय कायवं पाणी' म्‍हणत जवळ आली.
'मी आत्‍ताच संघवा काढला, पाणी लय खोल गेलं, मशीन पाणी ओढत नाही म्‍हणून त बंद केली...' मी त्‍या दोघींना सांगि‍तले.



'मंग दोर बाल्‍टी असीन त दे आमी काढतो पाणी' शांती इकडे ति‍कडे पोहरा शोधत म्‍हणाली.
'दोर बाल्‍डी आहे पण पाणी खुप खोल गेलं, बाल्‍डी पाण्‍यापर्यंत पोहचतच नाही...' मी उत्‍तर दि‍लं.
वि‍हीर समोर होती पण पाणी तरीहि‍ मि‍ळत नाही, हे पाहून दोघींची व्‍याकुळता वाढली. तहान अन् पाण्‍याचं नात असचं असतं. वेळेवर मि‍ळालं तर जीवन नाही तर मरण.

'मी दोर पोहरा घेवून वि‍हीरीत उतरतो अन् पोहराभर पाणी काढतो तुम्‍ही मला थोडी मदत करा वि‍हीरीत उतरण्‍यासाठी....' त्‍यांची पाण्‍यासाठीची कासावि‍स बघुन मी म्‍हणालो. त्‍यावर त्‍या दोघी एकदम दचकल्‍याच.. 'नाई ... नाई ... आमी या हौदातलंच पाणी पीतो...' त्‍या घाबरल्‍या सारख्‍या ओरडल्‍या.
'अहो त्‍यात आत्‍ताच कुत्री बसून गेली.. तीने गढूळ केलं सारं पाणी... थांबा मी काढून देतो ना तुम्‍हाला वि‍हीरीतलं पाणी... ' मी म्‍हणालो.
पण त्‍या दोघीही ऐकेनात. त्‍या हौदाकडे वळल्‍यात, तहानेने व्‍याकुळलेल्‍या त्‍या दोघींची मला अधि‍कच दया आली. त्‍यांच हौदातील कुत्रीने गढूळ केलेलं पाणी पीणे मला आवडलं नाही. मी घाई घाईने पोहरा घेवून वि‍हीरीत उतरायला लागलो. 'तुह्या हातचं पाणी न्‍हाई पायजे रे बाबा आमाले, तु त्‍या बौद्ध मास्‍तरचाच पोरगा हायेस ना?' त्‍यांनी किंचाळल्‍या सारखं मला वि‍चारले. मी मान हलवत हो म्‍हणालो. 'मंग नको आमाले पाणी' आमी तश्‍याच जातो राऊ दे ते पाणी-फाणी....' त्‍यांचे हे स्‍पष्‍टीकरण ऐकून माझ्याच तोंडचे पाणी पळाले. शरमल्‍या सारखे झालं मला. पाणी म्‍हणजे जीवन, शाळेत शि‍कलो होतो, व्‍यवहारात सुद्धा ते पटलं होतं. पण जात ही पाण्‍यापेक्षा ही जीवन मरणाचे कठोर सत्‍य असते, हे वास्‍तव वि‍स्‍तवाचा चटका लावून गेले. हौदातल्‍या पाण्‍याचे गुळणे करत, त्‍या दोघींनी तोंडावरुन हात फि‍रवि‍ला अन् घोट घोट पाणी पि‍वून त्‍या रस्‍त्‍याला लागल्‍या. मी हातात दोर पोहरा घेवून दूरपर्यंत त्‍यांनी पाहत होतों.

मुंबई

ऐरणीवरचा मुद्दा :https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjc7wC_JXmVr8as8-cABFos0keflzISqCMDDGp7DZJ9l7rgh0HQz6zxVMDB_YfYdFLAqFFL0LV597ShvF9qGxaXIRTRhFG-lzmOolq7_Ywjv3j5omvdIF_mOJ0RZ6CuWbrKSK_uu014RHEK/s1600-h/2030298879%5B1%5D.jpg"> id="BLOGGER_PHOTO_ID_5143343890929587938" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjc7wC_JXmVr8as8-cABFos0keflzISqCMDDGp7DZJ9l7rgh0HQz6zxVMDB_YfYdFLAqFFL0LV597ShvF9qGxaXIRTRhFG-lzmOolq7_Ywjv3j5omvdIF_mOJ0RZ6CuWbrKSK_uu014RHEK/s200/2030298879%5B1%5D.jpg" border="0" />1961 पासून मुंबई ही महाराष्‍ट्राची आहे हे दुर्दैवाने सांगावे नव्‍हे तर त्‍या साठी लढावे लागत आहे. महाराष्‍ट्राचा एक स्‍वाभाविक आणि सामाजिक भाग म्‍हणून ही मुंबईवर मराठी छाप आहेच परंतु तरीही त्‍यासाठी आंदोलने, निदर्शने करुन लढावे लागत आहे किवा त्‍यासाठी आंदोलने, निदर्शने करण्‍याची पाळी काही स्‍वार्थी लोकांनी जन-सामान्‍यावर लादली आहे. यात स्‍वार्थ कुणाचा व किती हे सांगण्‍याची ही वेळ नव्‍हे किवा ते सामान्‍यांना माहित नाहीत असेही नव्‍हे. मुंबई महाराष्‍ट्रातून वेगळी करण्‍यात येत आहे असे सांगून हेच स्‍वार्थी लोक लोक-भावनेचे भांडवल करुन स्‍वतःचा काही प्रमाणात फायदा सुद्धा करवून घेतात. म्‍हणजे मुंबई महाराष्‍ट्रा पासून जर वेगळी केली गेली तर मुंबईचा मराठी माणूस कंगाल होईल आणि आता मुंबई महाराष्‍ट्रात असल्‍याने जणू जन-सामान्‍यांचा खुप फायदा होत आहे असेच चित्र उभे केले जाते.
खरे पाहता मुंबई मधील मराठी माणूस हा मध्‍यम उत्‍पन्‍न गटात किंवा झोपडपट्टीत राहणारा गरीब वर्ग आहे. या वर्गालाच मुंबई बाहेर हद्दपार करण्‍याचा चंग महाराष्‍ट्राच्‍या मराठी सरकारनेच चालविला आहे. 47 वर्षात मुंबईच्‍या विकासासाठी राबविण्‍यात आलेल्‍या योजनांचा हलकासा आढावा जरी घेतला तरी ही गोष्‍ट लक्षात येईल की मुंबईच्‍या विकासासाठी राबविलेल्‍या योजना ह्या केवळ इथल्‍या गर्भ श्रीमंतासाठीच राबविल्‍या आहेत. जास्‍तीत जास्‍त विकास नीधी केवळ श्रींमतासाठीच वापरला गेला आहे आणि नाव मात्र मुंबईच्‍या विकास असे ठेवले आहे. गेल्‍या काही वर्षात विकासाच्‍या नावावर राबविलेल्‍या योजना कशा श्रींमंतांसाठी होत्‍या याची खात्री खालील काही उदाहरणांवरुन लक्षात येईल.
मुंबई ते शांघाय:
शांघाय कसे आहे किंवा ते कुठे आहे हे माझ्या सारख्‍या अनेक सामान्‍य जणांसाठी एक गुपितच आहे. मुंबईचे शांघाय होणार म्‍हणजे नक्‍की काय होणार हे सुद्धा एक कोडेच आहे. असे असले तरी एक स्‍वप्‍न नगरी जिथे खरोखरचं सार काही चकचकित, चमकणारे असेल एवढे मात्र खरे. एकुण काय, तर मुंबईचे शांघाई करणे म्‍हणजे असे एक महानगर बनवीणे जिथे सोनेरी माणसांचे रुपेरी इमले असतील आणि रंगीबेरंगी लांबच लांब गाड्यांसाठी चंदेरी महामार्ग असतील. अशा या शांघायीरुपी मुंबईत झोपडपट्या किंवा गरीबांना स्‍थान असणार काय? अर्थातच तसे ते असेल तर ती शांघायी होणारच नाही.
मुंबईचे शांघाई करण्‍यासाठी म्‍हणून काही झोपडपट्ट्यांमध्‍ये राहणा-यानां ईमारती दिल्‍या. याचे एक उदाहरणार्थ म्‍हणजे कांजूरमार्ग स्‍टेशन जवळील रेल्वेलगतच्‍या झोपड्यांना एमएमआरडीने सात मजली इमारतीं दिल्‍या पण त्‍यात खोल्‍या अगदीच छोट्या व लिफ्टची सोय कुठेच नाही. अशा इमारतींमध्‍ये ही लोक राहतील तरी कसे? झोपड्यांमधील असुविधांपेक्षा ह्या इमारतीमध्‍ये राहणे जास्‍त त्रासदायक आहे, म्‍हणून ह्या इमारतीमध्‍ये राहणा-या गरीब लोकांनी त्‍यांचा इमारतीमधील ब्‍लाक विकून जात आहेत, असा निर्ष्‍कश टाटा मूलभूत संशोधन केन्‍द्राच्‍या समाजसेवा विभागातील एका अभ्‍यास गटाने काढला आहे. आता पर्यंत असे समजले जात असे कि ह्या झोपडीतल्‍या लोकांनाच झोपडीत राहण्‍याची सवय आहे आणि अधिक पैशांसाठी ही लोक त्‍यांना मिळालेल्‍या इमारतीमधील फ्लॅट विकत आहेत. तात्‍पर्य काय तर.. गरीबांनी बंद फ्लॅटमध्‍ये तसेच गरीबित रहावे पण झोपडपट्यांमध्‍ये राहून दारिद्र्याचे प्रदर्शन करु नये. याला म्‍हणतात शांघायी..
श्रीमंतीचे फ्लायओहरः मोठ मोठी फ्लायओहर बांधून मुंबईचे शांघाई करीत असल्‍याचा भास करण्‍यात आला. बहुतेकांना वाटले की हा मुंबईचा विकास आहे. सकाळी सकाळी मुंबई मध्‍ये बेस्‍ट बसेस मधून प्रवास करणा-या सामान्‍य प्रवाशांच्‍या किती बसेस ह्या करोडोरुपयांच्‍या टोलेजंग पुलावरुन जातात याचा साधा विचार जरी केला तरी एक गोष्‍ट लक्षात येते कि हे फ्लायओहर केवळ श्रीमंत लोकांना आलिशान मोटारींतून त्‍यांच्‍या कार्पोरेट कार्यालयात अगदी सहजपणे जाता यावेत यासाठीच आहेत. मी गेल्‍या 15 वर्षापासून मुंबईमध्‍ये नोकरी करतो पण अख्‍या आयुष्‍यात माझी बस कधी ह्या फ्लायओहर वरुन गेल्‍याचे आठवत नाही. उलट या फ्लायओहर मुळे बेस्‍ट बसेसला ट्रॅफिकचा सामना करावा लागते असेच चित्र दिसते.
पर्या' 4203465335%5B1%5D.jpg? s1600-h QEnf-iVB500 AAAAAAAAAEI R2DVQaiIlvI _579SUw5f5JU bp3.blogger.com http:>https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIXJybfBExtultQWW-i9vu4u_Z7yUu2H9aZA4uVf64shGv1eRY_3bSWajgvdmGWYjhN5hGmwxM_B3uTlQegiDiWHM_XJa6PbtVD81K3oaBiRYx7cr1JAx7QsYIkWxhtyJTgtLR4vZjppYO/s1600-h/4203465335%5B1%5D.jpg"> id="BLOGGER_PHOTO_ID_5143345252434220786" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIXJybfBExtultQWW-i9vu4u_Z7yUu2H9aZA4uVf64shGv1eRY_3bSWajgvdmGWYjhN5hGmwxM_B3uTlQegiDiWHM_XJa6PbtVD81K3oaBiRYx7cr1JAx7QsYIkWxhtyJTgtLR4vZjppYO/s200/4203465335%5B1%5D.jpg" border="0" />अशी ही मुंबईची शांघायी होत आहे. आधिच गरीब असलेल्‍या हा गरीब मराठी माणूस शांघायीच्‍या विकासामध्‍ये अधिक डुबून बुचकळ्या खात आहे. अशा वेळेस मराठी माणूस मंदीरा शिवाय जाणार तरी कुठे? अर्थात तो आता सिद्धीविनायक आणि महालक्ष्‍मीच्‍या मंदीरावर गर्दी करीत आहे. आणि हळूहळू मुंबईपासून आपसूक तूटत आहे. मुंबईमध्‍ये नसला तरी मुंबईच्‍या मंदीरांमध्‍ये मात्र मराठी माणूस दिसतो हा त्‍याचाच पुरावा आहे.
अण्‍णा –भैय्या एक मैय्याः
पुर्वीपासूनच मुंबईमध्‍ये सर्व जातीधर्माचे, राज्‍य-प्रांताचे, भिन्‍न भाषांचे लोक राहत आहेत. मराठी आणि अमराठी हा भेद कधीचाच संपला आहे. हे शहर याआधीच राजकर्त्‍यांनी बहूभाषी घोषित केले आहे. त्‍यामुळे भाषेच्‍या अधिकाराने तसाही मुंबईवरचा अधिकार संपल्‍यातच जमा आहे. मुंबई आणि उपनगरांचा एवढा व्‍याप वाढला आहे कि नवी मुंबई, ठाणे, कल्‍याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्‍हासनगर, वसई, सारख्‍या महानगरपालिका व नगरपालिका लगतच्‍या असल्‍यामुळे मुंबईतच गणल्‍या जातात. महानगरपालिकेचा ताळेबंद एखाद्या राज्‍याचा असावा असा आहे. आज ना उद्या मुंबई राज्‍य म्‍हणून ते घोषित करावेच लागेल. श्रीमंतासाठीच अधिक सोई सुविधा दिल्‍या जात आहेत, त्‍यामुळे ते श्रीमंताचे राज्‍य होईल. म्‍हणजेच शांघाई होईल, आहे असे आपणास वाटत नाही काय?

मंगलवार, 5 फ़रवरी 2008

आंबेडकरी विचार

"Cultivation of mind should be the ultimate aim of human existence."
-Dr. Babasaheb Ambedkar

"Our ultimate goal is to become the governing class to rule this country".
Go and write this goal on the walls of your houses so that every day you will remember it.
- Dr B R Ambedkar

"An educated man without character and humility was moredangerous
than a beast. If his education was detrimental to the welfare of poor,
he was a curse to society."
- Dr B. R. Ambedkar

"Noble is your aim and sublime and glorious is your mission. Blessed are those who are awakened to their duty to those among whom they are born. Glory to those who devote their time, talents and their all to the amelioration of slavery. Glory to those who would reap their struggle for the liberation of the enslaved in spite of heavy odds, carping humiliation, storms and dangers till the downtrodden secure their Human Rights.”
- Dr. B. R. Ambedkar.

"A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of the society."
- Dr. B. R. Ambedkar

Unlike a drop of water which loses its identity when it joins the
ocean, man does not lose his being in the society in which he lives.
Man's life is independent. He is born not for the development of the
society alone, but for the development of his self.
-B. R. Ambedkar

Men are mortal. So are ideas. An idea needs propagation as much as a
plant needs watering. Otherwise both will wither and die.
-B. R. Ambedkar


"The duty of a good Buddhist is not merely to be a good Buddhist. His duty is to spread Buddhism. They must have the belief that to spread Buddhism is to serve mankind."
- Dr. Babasaheb Ambedkar

"Take Care that You Get What You Like Otherwise You Will Be Forced To like What You Get"

"An educated man without character and humility was more dangerous than a beast. If his education was detrimental to the welfare of poor, he was a curse to society."-- Bodhisattva Dr B. R. Ambedkar"Noble is your aim and sublime and glorious is your mission. Blessed are those who are awakened to their duty to those among whom they are born. Glory to those who devote their time, talents and their all to the amelioration of slavery. Glory to those who would reap their struggle for the liberation of the enslaved in spite of heavy odds, carping humiliation, storms and dangers till the downtrodden secure their Human Rights." -- Bodhisattva Dr. B. R. Ambedkar."A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of the society."
-Dr. B. R. Ambedkar

"An educated man without character and humility was moredangerous than a beast. If his education was detrimental to the welfare of poor, he was a curse to society."
-Dr B. R. Ambedkar

"Noble is your aim and sublime and glorious is your mission. Blessed are those who are awakened to their duty to those among whom they are born. Glory to those who devote their time, talents and their all to the amelioration of slavery. Glory to those who would reap their struggle for the liberation of the enslaved in spite of heavy odds, carping humiliation, storms and dangers till the downtrodden secure their Human Rights.”
-Bodhisattva Dr. B. R. Ambedkar.

"A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of the society."
-Bodhisattva Dr. B. R. Ambedkar

"Men are mortal. So are ideas. An idea needs propagation as much as aplant needs watering. Otherwise both will wither and die."
-Dr. Babasaheb Ambedkar


"Men are mortal. So are ideas. An idea needs propagation as much as a plant needs watering. Otherwise both will wither and die."
-Dr. Babasaheb Ambedkar

"Noble is your aim and sublime and glorious is your mission. Blessed are those who are awakened to their duty to those among whom they are born. Glory to those who devote their time, talents and their all to the amelioration of slavery. Glory to those who would reap their struggle for the liberation of the enslaved in spite of heavy odds, carping humiliation, storms and dangers till the downtrodden secure their Human Rights.

- Babasaheb Dr. B.R. Ambedkar.

"Noble is your aim and sublime and glorious is your mission. Blessed are those who are awakened to their duty to those among whom they are born. Glory to those who devote their time, talents and their all to the amelioration of slavery. Glory to those who would reap their struggle for the liberation of the enslaved in spite of heavy odds, carping humiliation, storms and dangers till the downtrodden secure their Human Rights.”
- Babasaheb Dr. B.R. Ambedkar.


Thoughts of Dr B R AMBEDKAR on 26th January & on Democracy:

On the 26th January 1950, we are going to enter into a life of contradictions. In politics we will have equality and in social and economic life we will have inequality. In politics we will be recognising the principle of one man one vote and one vote one value. In our social and economic life, we shall by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man one value. How long shall we continue to live this life of contradictions? How long shall we continue to deny equality in our social and economic life? If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. We must remove this contradiction at the earliest possible moment else those who suffer from inequality will blow up the structure of democracy which this Constituent Assembly has so laboriously built up.
On 26th Jan. 1950, India will be an independent country. What would happen to her independence? Will she maintain or will she lose it again? This is the first thought that comes to my mind.It is not that India was never an independent country. The point is that she once lost the independence she had. Will she lose it a second time? It is this thought which makes makes me most anxious for the future. What perturbs me greatly is the fact that not only India has once beforelost her independence, but she lost it by treachery of some of her own people...
The idea of fundamental rights has become a familiar one since their enactment in the American Constitution and in the Constitution framed by the Revolutionary France. The idea of making a gift of fundamental rights to every individual is no doubt very laudable. The question is how to make them effective? The prevalent view is that once the rights are enacted in law then they are safeguarded. This again is an unwarranted assumption. As experience proves, rights are protected not by law but by social and moral conscience of the society. If social conscience is such that it is prepared to recognise the rights which law proposes to enact, rights will be safe and secure. But if the fundamental rights are opposed by the community, no Law, no Parliament, no Judiciary can guarantee them in the real sense of the world. What is the use of Fundamental rights to the Untouchables in India ? As Burke said, there is no method found for punishing the multitude. Law can punish a single solitary recalcitrant criminal. It can never operate against the whole body of people who choose to defy it. Social conscience is the only safeguard of all rights, fundamental or non-fundamental.
What we must do is not to content ourselves with mere political democracy. We must make our political democracy a social democracy as well. Political democracy cannot last unless there is at the base of it, a social democracy. What does social democracy mean? It means a way of life which recognises liberty, equality and fraternity as the principles of life. These principles of liberty, equality and fraternity are not to be treated as separate items. They form a union in the sense that, to divorce one from the other is to defeat the very purpose of democracy. Liberty cannot be divorced from equality, nor can liberty and equality be divorced from fraternity.
So long as you do not achieve social liberty, whatever freedom is provided by the law is of no avail to you.
Law and order are the medicine of the body politic and when the body politic gets sick, medicine must be administered.
Democracy is not a Form of Government, but a form of social organisation.
My definition of democracy is - A form and a method of Government whereby revolutionary changes in the social life are brought about without bloodshed. That is the real test. It is perhaps the severest test. But when you are judging the quality of the material you must put it to the severest test.

बुधवार, 30 जनवरी 2008

बेडसे


लेणं किंवा लेणे हा मराठी शब्‍द 'लावण्‍य' या शब्‍दातून निर्माण झाला असून लावण्‍याचा समानार्थी शब्‍द सौंदर्य असा होतो. लेणं लेवूनच रुपाचे सौंदर्य वाढविल्‍या जाते. सह्याद्रीचे सौंदर्य वाढविण्‍याचेच काम ह्या शिल्‍पकृतींनी केले म्‍हणूनच कि काय मराठी भूमीपूत्रांनी ह्या शिल्‍पकृतींना तसचं साजेसं नांव दिले ते म्‍हणजे लेणी किंवा लेणे. महाराष्‍ट्रभर पसरलेल्‍या विशाल डोंगर माळांवर ह्या लेण्‍या नवश्रृंगार केलेल्‍या लावण्‍यवती नववधू सारख्‍या लाजून लपलेल्या आहेत. काही लोक यांना गुंफा म्‍हणतात किंवा इंग्रजीमध्‍ये Caves म्‍हणतात. परंतू ते तिककेसे पटत नाही. ह्या लेण्‍यांमध्‍ये आदिमानव राहत नव्‍हता तर मानवाच्‍या आध्‍या‍त्मिक, भौतिक, नैसर्गिक, विकासाचा अत्‍युच्‍च बिंदू दर्शविणा-या ह्या लेण्‍यांना गुंफा किंवा Caves संबोधने कसे योग्‍य ठरेल? या नाजूक कलाकुसरींन काठीण्‍यातून कमनियता, परिश्रमातून परमता, भंगतेतून चिरंतनता, चिरंतेतून चैतन्‍यता दाखवून दगडात जीव ओतण्‍याचे काम केले आहे. हे खरेच डोंगरांनी ल्‍यालेलं अद्वितिय लेणंच आहे म्‍हणून भूमीपूत्रांनी केलेलं यांचं नामकरण 'लेणं' हे अगदी सार्थक असेच वाटते. बेडसे लेणे 'बेडसा' या नावाने सुद्धा ओळखल्‍या जातात. महाराष्‍ट्र पूणे जिल्‍हातील मावळ तालुक्‍यात बेडसे लेणे आहेत. लोणावळा पुणे राष्ट्रिय महामार्गा क्रमांक 4 वर; लोणावळ्यापासून सोमटने फाट्यापर्यंत या व तेथून बेडसे गांवाकडे जाणा-या मार्गाने पुढे गेल्‍यास; जवळच सह्याद्रीच्‍या रांगांमध्‍ये ह्या लेण्‍या आहेत. ह्या लेण्‍यांचा काळ इसवी सनापूर्वी पहिल्‍या शतकातील सांगीतला जातो. बेडसे येथे दोन प्रमुख्‍य लेण्‍या आहेत ज्‍यामध्‍ये एक चैत्‍यगृह असनू त्‍यामध्‍ये भव्‍य स्‍तुप आहे तर दूसरी लेणी विहार आहे. बेडसेच्‍या लेण्‍या सूर्यमुखी असून पहाटेचे कोवळ्या उन्‍हाची प्रथम किरण ही ह्या सुंदर स्‍तुपावर पडते. प्रभातीच्‍या कोवळ्या उन्‍हात ह्या लेण्‍या बघण्‍यात एक वेगळाच आनंद मिळतो. कार्ले व भाजे या दोन ठिकाणच्‍या लेण्‍यांपेक्षा बेडसेची प्रसिद्धी कमी आहे त्‍यामुळे इथे गर्दी अजिबात नसते. कधी तरी एखाद दूसरी ट्रिप सोडली तर इथे कुणी सहसा जात नाही. पण जर कार्ले भाजेला जात असाल तर नक्‍कीच बेडसेला भेट द्या. एक अपूर्व अशी 2100 वर्षापूर्वीची कोरीव लेणी पाहण्‍याचा आनंद ही अपूर्वच असतो. कार्ले व भाजे ह्या लेण्‍या ब-याच प्र‍चलित आहेत; त्‍यामुळे त्‍यांची माहिती येथे देणे उचित होणार नाही. जिज्ञासूंनां ही माहिती विकीपेडिया किंवा इतर वेब साईटवर सुद्धा मिळू शकेल. बेडसे एक प्राचिन सुंदर परंतू तरी दूर्लक्षित लेणे आहे म्‍हणून त्‍याचा उल्‍लेख करणे महत्‍वाचे आहे.

गुरुवार, 1 मार्च 2007

विद्या व शिक्षण


विद्येविना मती गेली

मती विना गती गेली

गती विना वित्‍त गेले

वित्‍ताविना शुद्र खचले

एवढे अनर्थएका अविद्येने केले...
आयुष्‍यभर स्‍वतःला विद्यार्थी म्‍हणवून घेणारे आणि शेवटपर्यंत केवळ पुस्‍तकांच्‍याच सानिध्‍यात राहणारे डॉ.आंबेडकर शिक्षणाची महती विशद करतांना म्‍हणतात ......

‘’शिक्षण हे वाघि‍णीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्‍याशिवाय राहत नाही’’


आमच्‍या आदर्शांची महावचने नाही म्‍हटले तरी काही अंशी आम्‍ही पाळलीत... आम्‍ही शिकलो... मोठे झालो... मोठ् मोठ्या पगाराच्‍या नोक-या करीत आहोत.. राहणीमान बदललेय... सुटाबुटात राहू लागलोय... शहरात राहू लागलोय....

फुलेंच्‍या महावचनाचा विचार करता एका अविद्येने काय करु शकते ते लक्षात येते पण फुलेंच्‍या महावचनाचा क्रम जरा उलटाकरुन बघूया म्‍हणजे .. .

अविद्येचे अनर्थ टाळण्‍यासाठी आम्‍ही विद्या आत्‍मसात केलीआणि आमच्‍याकडेवित्‍त आले.. म्‍हणजेच चांगल्‍या पगाराच्‍या नोक-या मिळविल्‍यात..थोडीशी का होईना गती आली ... मती किती आली हा प्रश्‍न वादाचा आहे... म्‍हणजे ती आली की नाही हेही गंभीरतेने विचार करुनच ठरवावे लागेल....

दूसरे महत्‍वाचे महावचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे... ते म्‍हणजे शिक्षण हे वाघि णीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्‍या शिवाय राहत नाही..... हजारोंनी शिक्षण घेतले लाखों घेत आहेत मग एवढे सगळे वाघि णीचे दूध पि णारे गुरगुरत का नाही. अहो गुरगुरणे सोडाच साधे खकारण्‍याचा आवाज सुद्धा काढत नाहीत.... नरेद्र जाधव, ...... आदिंचे अपवाद सोडले तर सगळेच कसे मेल्‍या सारखी वाटतात.

मला नेहमीच हे कोड सुटलेले नाहीए. एक तर ही वचने खोटी असावीत किंवा आम्‍ही घेतलेले शिक्षण हे शिक्षण तरी नसावे किंवा माणसे खोटी असावीत ह्या तीन पर्याया पैकी नक्‍कीच एक खरा असावा असे वाटते... कोणता ?

सोमवार, 26 फ़रवरी 2007

संगणक व मराठी डिटीपी

दिनांक २५ फेब्रुवारी २००७ रवीवार रोजी संगणक व मराठी डीटीपी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा विषेश वृतांत पुढील प्रमाणे आहे.

कार्यशाळेचे उद्घाटक श्री